हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल बदल
  कायदे विषयक बाबी
  इतर विषय त्यासंबधातील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
 
कायदे विषयक बाबी - साईन व्हिव्यु - महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध मंडळ
 
महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध मंडळ (1970-1981 या कालावधी साठी)
 

महाराष्ट्र जल प्रदुषण प्रतिबंध अधिनियम 1969च्या तरतुदी अंतर्गत स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र जल प्रदुषण प्रतिबंध मंडळ हे भारतातील पहिले मंडळ आहे.  राज्यामध्ये जल प्रदुषणावर प्रतिबंध घालण्यासाठी अधिनियमांच्या तरतुदींचे पालन करावे यासाठी जल प्रदुषण करणाऱ्या एजेन्सींना जागरुक करणे ही मंडळाची भूमिका होती. मंडळाने व्यापक सर्वेक्षण करुन तसेच संमती द्वारा अधिकाधिक सांडपाण्याचे नमूने गोळा करुन अनेक नद्यांचे पात्र “ जल प्रदुषण प्रतिबंध क्षेत्र ” म्हणून घोषित करण्याची शिफारस राज्य सरकार कडे केली.  महाराष्ट्र जल प्रदुषण प्रतिबंध अधिनियम 1969च्या अंतर्गत 19 नद्यांचे पात्र “जल प्रदुषण प्रतिबंध क्षेत्र ” म्हणून घोषित करण्यात आले.  मंडळाची भूमिका जरी जल प्रदुषण करणाऱ्या एजेंन्सींना शिक्षित करण्याची व त्यांच्या संमतीने त्यांचे सांडपाणी संग्रहीत करण्याची होती तरी ही मंडळाने 90 दोषी उद्योगांवर खटले दाखल केले होते त्यापैकी 35 मामले न्यायालयांच्या परवानगीने संमत अटींचे पालन केल्यानंतर मिटविण्यात आले.   जल प्रदुषण प्रतिबंध अधिनियम 1969च्या तरतुदींनुसार केलेल्या कायदेशिर कार्यवाहीची स्थिती दर्शविणारा तक्ता खालील प्रमाणे आहे.

 
महाराष्ट्र जल प्रदुषण प्रतिबंध अधिनियम 1969 च्या तरतुदीं अनुसार दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची स्थिती दर्शविणारा तक्ता
 
महाराष्ट्र जल प्रदुषण प्रतिबंध अधिनियम 1969च्या अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या मामल्यांची संख्या मंडळाच्या बाजूने निर्णय दिलेल्या मामल्यांची संख्या
90 अ) मिटविलेले खटले:  35 मामल्यांमध्ये नुकसान भरपाई लागू करुन न्यायालयाच्या परवानगीने पालन केल्या नंतर सामोपचाराने खटले मिटविण्यात आले.
ब) न्यायालयाने 20 मामल्यांमध्ये मंडळाच्या बाजूने निकाल दिले.
   
वरील मामल्यांच्या बाबत सुद्धा विलंबित काळादरम्यान न्यायालयाच्या परवानगीने आरोप मागे घेण्याच्या तरतुदीं संबंधी संमत अटींचे पालन करण्याची हमी घेण्याचे अधिकार मंडळाला दिलेले आहेत.  खटला दाखल केल्या नंतर, दोषी उद्योग,  संमत अटींचे पालन करून सामोपचाराने खटला मागे घेण्याची विनंती कोर्टाकडे करू शकतो.  कोर्ट अशा मामल्यांमध्ये मंडळा कडून सत्यापन अहवाल मागविते व त्या अनुपालन अहवालाच्या आधारे,  अशा उद्योगांवर आवश्यक ती किंमत /नुकसान भरपाई आकारुन सामोपचाराने आरोप मागे घेण्याची अनुमती देवू शकते.    मंडळाने ज्या 35 दोषी उद्योगांच्या विरुद्ध खटले दाखल केले आहेत त्यांच्या विरुद्ध केलेले आरोप मागे घेवून त्यांच्या कडून अनुपालन करण्याची हमी घेवू शकते.   महाराष्ट्र जल प्रदुषण प्रतिबंध अधिनियम 1969 च्या तरतुदीं अंतर्गत एकूण 55 मामल्यांचे निकाल मंडळाच्या बाजूने लागलेले आहेत.  त्यावेळच्या कायद्याच्या अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यांचे एकूण निर्णय उत्साहवर्धक होते.   महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ठराव पारित करुन, केन्द्रीय जल (प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1974 चा अंगीकार केल्या नंतर दिनांक 1/7/1981 रोजी महाराष्ट्र जल प्रदुषण प्रतिबंध अधिनियम 1969 रद्द करण्यात आला.
 
 
image
 
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ आरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप